नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील ३२ कैद्यांना लागली सोरट; प्रजासत्ताक दिनी मुक्तता..

नाशिक : यंदाचे वर्ष खास असून यानिमित्ताने आज प्रजासत्ताक दिनाच्या (of Republic Day) मुहूर्तावर नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून (Nashik Road Central Jail) ३२ कैदी मुक्त करण्यात आले आहेत. यंदा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव (Amrit Mahotsav of Freedom) संपूर्ण देश साजरा करत असून केंद्र सरकारने कारागृहातील कैद्यांच्या आयुष्यात चांगला बदल व्हावा, त्यांनी समाजात चांगले नागरिक व्हावे यासाठी केंद्र सरकारने काही योजना राबवल्या आहेत. जे कैदी कारागृहातील सर्व नियमांचे पालन करतात, चांगले वर्तन करतात अश्या कैद्यांसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) यांच्या अध्यक्षतेखाली काही योजना राबवल्या जात असून भारतीय प्रजासत्ताक दिनी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून चांगले वर्तन करणारे ३२ कैदी मुक्त करण्यात आले. त्यामुळे या कैद्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या बाबत अधिकाची माहिती अशी की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत भारतीय प्रजासत्ताक दिनी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून ३२ कैदी मुक्त करण्यात आले आहे. संपूर्ण देशभरात आझादी का महोत्सव साजरा होत असताना केंद्र सरकारच्या विशेष योजनेअंतर्गत न्यायालयाने ज्या कैद्याना शिक्षा सुनावली आणि सुनावलेल्या शिक्षेपैकी ६६% शिक्षा कायद्याने भोगली, अशा नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून ३२ कायद्यांना शिक्षेच्या कालावधीतील ३४% सूट मिळाली आहे.

शिक्षेच्या कालावधीत या कैद्यांनी कारागृहातील सर्व नियमांचे पालन केले, चांगले वर्तन केले अश्या कैद्यांचा यात समावेश आहे. महाराष्ट्रातील जेलमधून 180 कैद्यांना सोडण्यात आले आहे. त्यात नाशिकच्या नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहातून 32 कैदी आज सोडण्यात आले आहे.