नाशकात १५ दिवस मनाई आदेश लागू

नाशिक : शहरात मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. राज्यातील राजकीय घडामोडी आगामी धार्मिक सण उत्सव यासह विविध संघटनांकडून होणारी निदर्शने आंदोलन यामुळे पोलीस प्रशासन सतर्क झाल्याचे दिसत आहे. शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यामुळे नाशिक शहर पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी 13 ते 27 जुलै दरम्यान शहरात मनाई आदेश लागू केले आहेत.


सध्याची राजकीय परिस्थिती पाहता शहरात शांतता राहावी तसेच देशात काही व्यक्तींकडून जातीय तेढ निर्माण केला जात आहे त्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील शांततेचा भंग होऊ नये यामुळे पोलीस आयुक्त जयंत नाईक नवरे यांनी पंधरा दिवस महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार मनाई आदेश लागू केले आहेत. राजकीय वातावरणाबरोबरच , देशात सामाजिक तेढ देखील निर्माण होऊ लागले आहेत आणि त्याबरोबरच आगामी काळा त गणेशोत्सव नवरात्र उत्सव यासारखे मोठे सहन उत्सव येऊन ठेपले आहेत या पार्श्वभूमीवर शहरात शांतता राहावी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे