शिरपूर: महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात मुंबई-आग्रा महामार्गावर ट्रक आणि काही चारचाकी आणि दुचाकींच्या झालेल्या अपघातात किमान 10 जण ठार झाल्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे.
धुळ्याचे एसपी संजय बारकुंड यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच ते सहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील मध्य प्रदेश सीमेवरील पलासनेर गावात मंगळवारी सकाळी हा अपघात झाला.
एसपी म्हणाले, महामार्गावर मुंबईच्या दिशेने जात असलेल्या एका डंपर ट्रकचा ब्रेक फेल झाल्यामुळे तो रस्त्याच्या कडेला असलेल्या काही दुचाकी आणि चारचाकी गाड्यांना धडकला आणि नंतर बस स्टॉपवर जाऊन धडकला.
अपघातात किमान 10 लोकांचा मृत्यू झाल्याची आम्हाला भीती आहे. धुळे जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.