‘चून चून के मारेंगे’वर अजित पवार भडकले; म्हणाले त्यांना सत्तेची नशा…

या सरकारमधील आमदार आणि मंत्री बोलतात कसे? चुन चुन के, गिन गिनके मारू, असे हे लोक म्हणतात. असे बोलायला देशात काय मोगलाई आहे का? लोक डोक्यावर घेतात व पायाखाली घेतात. एकनाथ शिंदे सरकारमध्ये काही मंत्री, आमदारांना सत्तेची नशा व मस्ती आली आहे. अरे कारे सुरु आहे, यासाठी सत्ता घेतली आहे का?, असा सवाल करत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे. अजित पवार सध्या उस्मानाबाद दौऱ्यावर आहेत तिथे ते बोलत होते.


अजित दादा आक्रमक

अजित पवार पुढे बोलताना म्हणाले, राजकीय लाटा येतात आणि जातात असे सांगतानाच बेरोजगारीचा प्रश्न आहे. हे प्रश्न कोण सोडवतंय? असा सवालही अजित पवार यांनी केला. एकनाथ शिंदे सरकारमध्ये काही मंत्री. आमदारांना सत्तेची नशा व मस्ती आली आहे. अरे कारे सुरु आहे, यासाठी सत्ता घेतली आहे का? बोलताना भान ठेवले पाहिजे. कोणाचा अनादर होईल असे करू नका. आपल्यावर संस्कार झाले आहेत, महाराष्ट्र संस्कृती अपमान होईल असे बोलू नका, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.


भाजपचे कौतुक

प्रदेश सरचिटणीस सुरेश पाटील यांच्यावर अजित पवार म्हणाले, कोणीच कोणाचा कायम विरोधी नसतो. सत्तेच्या लाटा येतात आणि जातात. त्यामुळे मी कधीही भेदभाव करीत नाही. त्यामुळे अनेक वेळेस आमदार झालो, असे अजित पवार यांनी सांगितले. राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच आपला पक्ष संपला असे म्हटलं तर कसे होणार? अशा शब्दात त्यांनी यांचे कान टोचलेय कधीच कोणाचा पक्ष संपत नसतो. भाजपचे केवळ 2 खासदार होते. मात्र ते थांबले नाहीत, असं सांगत त्यांनी भाजपचं कौतुक केले. कुठेच कुणाची मक्तेदारी नसते. आता तर कोणीही कोणाला फोडत आहे. सध्या राज्यात 50 खोके, एकदम ओक्के सुरू आहे, असा टोला त्यांनी शिंदे गटाला लगावला.

आम्ही वेगळ्या विचारांचे तरी सरकार चालवले

बाळासाहेब ठाकरे यांणी शिवसेना वाढविली. पण त्यांच्या मुलाला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी काही लोक कोणत्याही थराला गेले. उलट आम्ही वेगळ्या विचाराचे असतानाही सरकार चालविले, असा चिमटाही त्यांनी शिंदे गटाला लगावला. उद्याच्या काळात राज्याचा कारभार कोणाच्या हातात द्यायचा याचा विचार करून आमदार निवडून द्या. बूथ कमिटी स्थापन करा. पक्ष वाढवण्यासाठी काम करा, असे आवाहन त्यांनी केले.