लग्नाचा तगादा लावल्याने दोघा प्रियकरांनी रचला प्रियसीच्या हत्येचा कट!

प्रियसी लग्नाचा तगादा लावत असल्याने तिच्या दोन्ही प्रीयकरांकडून कट रचत तिची हत्या घडवून आणली आहे. ही धक्कादायक घटना गुजरातच्या वडोदरा येथील आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून परिसर हादरला आहे. मृत महिलेचे दोन प्रियकर होते. या दोघांनीच तिचा गळा आवळून खून करत तिचा मृतदेह पुलावरून खाली फेकून दिला आहे. याप्रकरणी छणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाडोदऱ्याच्या रानौली बसस्थानकाजवळ चमेली नामक एक महिला राहत होती. ती विवाहित असून तिला तीन मुले देखील होती. मात्र, ती तिच्या पतीपासून विभक्त राहत होती. दरम्यान, ती अजय यादव नामक एका व्यक्तीसोबत डिसेंबरपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मात्र अचानक त्याचे गावी लग्न जमत असल्याने तो तिला सोडून गावी गेला.

काही दिवसांनी चमेली अजयचा मित्र उदय शुक्ला याच्या संपर्कात आली आणि दोघांचे प्रेमसंबंध जुळले. दोघांमध्ये शारीरिक संबंधही निर्माण झाले. उदयचे लग्न झाले होते आणि चमेलीने त्याच्यावर लग्नासाठी तगडा लावण्यास सुरुवात केली. मात्र, उदयला चमेलीसोबत लग्न करायचे नव्हते, त्यामुळे या सर्वाना वैतागून त्याने हे सर्व अजयला सांगितले.

मग दोघांनी यातून सुटका व्हावी यासाठी तिच्या हत्येचा कट बनवला, उदय शुक्ला याने चमेलीला दुचाकीवर बसवून पद्मला गावातील मिनी नदीवर नेले. जिथे अजय आधीच त्याची वाट पाहत होता. दोघांनी मिळून चमेलीचा गळा आवळून मृतदेह पुलावरून खाली फेकून दिला.

याप्रकरणी वडोदरा शहर गुन्हे शाखा आणि छणी पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकांनी एकत्रित काम करून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.