धक्कादायक..! रागाने पाहिलं म्हणून घडवून आणली हत्या!

आजकाल कुरापातीतून मोठे गुन्हे घडत असून अशीच एक धक्कादायक घटना मुंबईमध्ये घडली आहे. पूर्व वैमन्यासातून एका तरुणासोबत कुरापत काढून तिघांकडून एकाची जबर मारहाण करत हत्या घडवून आणली आहे. रागात बघत असल्याचे कारण देत तिघांनी एकाला जबर मारहाण केली त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना मुंबईच्या माटुंगा लेबर कॅम्प परिसरात घडली असून घटनेने परिसर हादरला आहे. रोनित भालेराव ( वय. २८) असे या मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोनित भालेराव आणि संशयित आरोपी रुपेश सौदे, मनिष राठोड, सागर साळवी एकाच परिसरात रहात असून दोघांमध्ये पूर्वीपासूनच वाद होते. यादरम्यान रविवारी दुपारी शेरावती देवी मंदीरासमोर आरोपी उभे असताना रोहितही तेथे होता. त्यावेळी रोहित रागात बघत असल्याचे कारण देत तिघांनी त्याला जबर मारहाण केली. या मारहाणीत रोहितचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी शाहू नगर पोलिसांनी तीनही आरोपींवर ३०२, ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.


दरम्यान, काही शुल्लक कारणांवरून खून होत असून असे प्रकरण वाढत आहेत. राज्यात एकूणच गुन्हेगारीचा आलेख वाढत चालला असून यावर कठोर उपाययोजनांची आवश्यकता आहे. एन सणासुदीचे अशी घटना घडल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण देखील पसरले असून भालेराव परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. आरोपींना लवकरात लवकर आणि कठोर शिक्षा करण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात येत आहे.