जिल्ह्यातील २९२ नगरपंचायत उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यात सहा नगरपालिकांसाठी झालेल्या निवडणुकीत एकूण ७६.४८ टक्के मतदान झाले असून सर्वाधिक मतदान हे आदिवासी बहुल पेठ नगरपंचायतीत झाले आहे. याबरोबरच ८२ जागांसाठी सहा नगरपंचायतींत ३०० उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले.

जिल्ह्यातील सहाही नगरपंचायतींत मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी थंडी असूनही मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणुकीत एकूण ७६.४८ टक्के मतदान झाले असून सर्वाधिक मतदान पेठ नगरपंचायतीत झाले तर निफाड आणि कळवण मध्ये सर्वात कमी सरासरी ७४ टक्के मतदान झाल आहे.

दरम्यान या सहा नगरपंचायत निवडणुकीत एकूण ८७ जागांवर २९२ उमेदवार रिंगणात उभे आहेत. या प्रमाणे दिंडोरीत १७ प्रभागात ५२ उमेदवार रिंगणात आहेत. कळवणमध्ये १४ प्रभागातील ४९ जागांवर सामना रंगणार आहे. पेठ तालुक्यात २७ प्रभागांसाठी ७२ जागांवर निवडणूक होत आहे. निफाडमध्ये १४ जागांसाठी ४३ उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. सुरगाणा येथे १७ प्रभागात ७२ जणांमध्ये निवडणूक होणार आहे. तर देवळ्यात ११ जागांसाठी ३३ जणांमध्ये लढत होणार आहे.

मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा नगरपंचायतीत सुमारे १५ टक्क्याने मतदान वाढले असून, या वाढीव मतदानाचा कोणाला फायदा मिळणार याबाबत उत्सुकता लागली आहे. निकालासाठी मात्र २९ दिवसांची प्रतिक्षा करावी लागणार आहे.