एकनाथ शिंदे गटाने केली पूरग्रस्तांना मदतीची घोषणा..

By चैतन्य गायकवाड |

गुवाहाटी : सध्या आसाम (Assam) हे दोन कारणांमुळे चर्चेत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारे शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Shivsena leader and Minister Eknath Shinde) हे गुवाहाटी (Guwahati) मधील हॉटेलमध्ये थांबलेले आहेत. त्यांच्यासोबत शिवसेनेचे तसेच काही अपक्ष आमदार देखील आहेत. या बंडखोर आमदारांची पंचतारांकित हॉटेलमध्ये चांगली बडदास्त ठेवली जात आहे. मात्र, दुसरीकडे आसाममधील पूर स्थिती गंभीर होत आहे. आसाममध्ये (Assam) पूरपरिस्थिती अजूनही गंभीर आहे (flood situation serious in assam). या पूर परिस्थितीने आसाममध्ये आतापर्यंत तब्बल ४५ लाखांपेक्षा अधिक नागरिक बाधित झाले आहे. या पुराचा तडाखा बसल्याने जवळपास १०० पेक्षा जास्त नागरिकांचा बळी गेल्याची माहिती आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या गटाने ह्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून आसाममधील पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या शिवसेनेच्या बंडखोर आणि सहयोगी आमदारांकडून ५१ लाखांची मदत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत घोषणा केली आहे. एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे की, “आसाम मधील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी शिवसेनेचे सर्व आमदार तसेच सहयोगी आमदारांच्या वतीने आसाम मुख्यमंत्री मदत निधीत ५१ लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय.” आसाममध्ये पुराने खूप नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे. या पुराने सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पुराचा लाखो लोकांना फटका बसला आहे.

तर आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा (Assam CM Hemant Biswa Sarma) हे स्वतः पूरग्रस्त भागात जाऊन मदत करण्याचा सूचना देताना दिसत आहे. आसाम सरकार पूरग्रस्तांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करत आहे. या पुरामुळे आसाममधील परिस्थिती बिकट झाली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लाखो नागरिकांना पुराच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. या पुरामुळे अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याची देखील माहिती आहे. आसामचे मुख्यमंत्री स्वतः या पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी पूरग्रस्त भागात लक्ष ठेऊन आहे.