‘कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी तोंडाला आवर घालावा अन्यथा..’, सीमावादावरून राज ठाकरे आक्रमक

Maharashtra-Karnataka Border Issue : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद उफाळला असून आत राज ठाकरेंनी आक्रमक भुमिका घेत थेट कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी तोंडाला आवर घालावा असं राज ठरे यांनी म्हंटले आहे. गरज पडल्यास जशाच तसं उत्तर देणार असा देखील ईशारा त्यांनी दिला आहे. तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पक्ष विसरून भूमिका घ्यावी असंही ते म्हणाले आहे.

राज ठाकरे यांनी ट्विटरवर आपली ही आक्रमक भूमिका मांडली आहे. ‘मी मध्यंतरी बोललो होतो तसं महाराष्ट्र-कर्नाटकचा सीमावाद उफाळून यावा यासाठी पुन्हा कोणाकडून तरी प्रयत्न सुरू झालेत. तिकडून कोण खतपाणी घालतय हे तर उघड दिसत आहे. मात्र इथे पण कोणी ह्याला खतपाणी घालत आहे का ? हे सरकारने पाहायला हवं. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता जरा तोंडावर आवर घालावा आणि हा प्रश्न चिघळू देऊ नये महाराष्ट्र गाड्यांची तोडफोड, तिथल्या मराठी माणसांना त्रास असले प्रकार सुरू आहेत. ते तात्काळ थांबावा’ असं राज ठाकरे म्हणाले आहे.

,हा प्रश्न चर्चेने आणि सामोपचारानेच सुटायला हवा. मात्र, जर समोरून संघर्षाची कृती केली जाणार असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय करू शकते याची चुणूक माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी दाखवली आहे. त्यामुळे गरज पडली तर आमचं उत्तर पण तितकंच तीव्र असेल हे विसरू नका. येणाऱ्या २०२३ च्या कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकांसाठी हा मुद्दा उकरून काढला जातो आहे आणि महाराष्ट्राला नाहक छळलं जात आहे. माझं मराठी बांधवांनाही हे सांगणं असेल की त्यांना जे हवय ते नाही द्यायचं आपल्याला जे हवे ते आपण करायचं’ असा ईशारच राज ठाकरेंनी दिला आहे.

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणतात ‘अचानकपणे चहूबाजूंनी राज्यांच्या सीमांवर दावा सांगितला जातोय. हे प्रकरण साधंसोपं नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या भूमीकडे येणारी बोटं पिरगळी जातील हे बघावं. इथे आपण कुठल्या पक्षाचे आहोत हे विसरून महाराष्ट्राचे आहोत हेच स्मरून कृती व्हावी अशी अपेक्षा आहे. केंद्र सरकारने ही या प्रश्नावर वेळीच लक्ष घालावे आणि हा वाद चिघळणार नाही हे पहावं..मी पुन्हा सांगतोय की कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यात कमालीचा एकजिनसीपणा आहे. आज इथल्या अनेकांची कुलदैवत कर्नाटकात आहे. तर अनेक कन्नडीगांची कुलदैवत महाराष्ट्र आहे. थोडक्यात दोन राज्यातील बंध हा मजबूत आहे. त्यामुळे संघर्ष होऊच नये. पण तरीही जर समोरून कर्नाटकची भाषा निव्वळ आव्हानाची असेल तर ते स्वीकारायला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि इथली मराठी जनता तयार आहे. संघर्ष न होण्यात आणि मैत्र टिकण्यातच सर्वांचे हित आहे. असं राज ठाकरे यांनी ट्वीट च्या माध्यमातून म्हंटल आहे.