‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ ७४५ मुलांची घरवापसी; उल्लेखनीय कामगिरी

रेल्वे सुरक्षा दलाने ” ऑपरेशन नन्हे फरिश्ते ” अंतर्गत ६ महिन्यात ७४५ मुलांना वाचवण्याची जबाबदारीही पार पाडली. जानेवारी २०२२ ते जून २०२२ या कालावधीत मध्य रेल्वेवरील रेल्वे स्टेशन , प्लॅटफॉर्मवरील ७४५ मुलांचे घरवापसी तर काहींचे पुनर्वसन केले आहे . यामध्ये ४९० मुले आणि २५५ मुलींचा समावेश आहे. या मुलांचे चाइल्डलाइन संस्थेच्या मदतीने पुनर्मिलन घडविण्यात आले आहे.

भांडणामुळे किंवा काही कौटुंबिक समस्यांमुळे चांगल्या जीवनाच्या शोधात आपल्या कुटुंबियांना सोडून मोठ मोठ्या शहरांमध्ये पलायन करण्यासाठी रेल्वे स्थानकावर येणारी मुले प्रशिक्षित आरपीएफ जवानांना आढळतात . हे प्रशिक्षित आरपीएफ कर्मचारी मुलांशी जवळीक साधतात , त्यांच्या समस्या समजून घेतात आणि त्यांना त्यांच्या पालकांशी पुन्हा एकत्र येण्यासाठी सल्ला देतात. यात वेगवेगळ्या शहरांमध्ये अशी मुले सापडली आहे. त्यात

मुंबई विभागात सर्वाधिक ३८१ मुलांचे पुनर्वसन म्हणजेच घरवापसी झाली असून त्यात २७० मुले आणि १११ मुलींचा समावेश आहे . भुसावळ विभागात १३८ मुलांची नोंदणी झाली असून त्यात ७२ मुले व ६६ मुलींचा समावेश आहे . पुणे विभागात १३६ मुलांची नोंदणी झाली असून यामध्ये ९ ८ मुले आणि ३८ मुलींचा समावेश आहे . नागपूर विभागात ५६ मुलांमध्ये ३० मुले आणि २६ मुलींचा समावेश आहे . सोलापूर विभागात ३४ मुलांची नोंद झाली असून त्यात २० मुले व १४ मुलींचा समावेश आहे.

गेल्या वर्षी म्हणजे २०२१ च्या जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत मध्य रेल्वे आरपीएफ ने शासकीय रेल्वे पोलीस आणि इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समन्वयाने ६०३ मुले आणि ३६८ मुलींसह ९ ७१ मुलांचे पुनर्वसन केली आहे.

अशी उल्लेखनीय कामगिरी ” ऑपरेशन नन्हे फरिश्ते ” अंतर्गत रेल्वे सुरक्षा दलाने करून दाखवली आहे.