जयंतराव तुम्ही आमचा २५ वर्षांचा संसार मोडला – गिरीश महाजन

नाशिक । प्रतिनिधी

‘विरोधी पक्षाकडून भाऊ शुभेच्छा तुम्हाला घ्याव्या लागतील. कारण सर्व सत्ताधारी नेते इथे आले आहेत आणि आमचा 25 वर्षांचा संसार होता, पण तो संसार तुम्ही मोडला, अस म्हणत भाजप नेते गिरीश महाजन यांनी जयंत पाटील यांना टोला लगावला आहे. यावेळी जयंत पाटील यांनीही रोखठोक उत्तर देत प्रतिटोला लगावला.

राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मुलाच्या विवाह प्रसंगी राज्यातील विविध नेत्यांनी हजेरी लावली. त्यावेळी सर्व नेते एकत्र असतांना महाजन आणि पाटील यांच्यात कलगीतुरा पाहायला मिळाला. झाले असे कि सर्वजन मतभेद विसरून गप्पा मारत होते. यावेळी गिरीश महाजन यांनी नवदाम्पत्यास शुभेच्छा देता देता, गुलाबराव पाटलांकडे बघून, ‘विरोधी पक्षाकडून भाऊ शुभेच्छा तुम्हाला घ्याव्या लागतील. कारण सर्व सत्ताधारी नेते इथे आले आहेत आणि आमचा 25 वर्षांचा संसार होता, पण तो संसार तुम्ही मोडला, अस म्हणत त्यांनी टोला लगावला. मात्र गिरीश महाजनांना जयंत पाटील यांनी उत्तर दिल.’त्यांची ती खंत आहे, दुःख आहे. आम्ही फारस लक्ष देत नाही, अस म्हणत त्यांचा संसार का मोडला आहे. याच उत्तर उद्धव ठाकरे यांनी वेळोवेळी दिल आहे’, असा प्रतिटोला जयंत पाटील यांनी यावेळी लगावला. तर नवाब मलिक यांनी ही गिरीश महाजनांचा समाचार घेतला. आज इथं संसार जोडत आहे. आज शुभ दिनी त्यांनी शुभ बोलायला पाहिजे होत.मात्र ते अपशब्द बोलले..

या विवाह प्रसंगी हजारोंच्या संख्यने नागरिक उपस्थित होते. यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, भाजप नेते गिरीश महाजन, कृषीमंत्री दादा भुसे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, परिवहन मंत्री अनिल परब,अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक, उदय सामंत, अदिती तटकरे यांच्यासह अनेक महाविकास आघाडीतील पदाधिकार्यांनी हजरी लावली.