मकरसंक्रातीच्या दिवशी नाशिकच्या जवानाला वीरमरण

नाशिक | प्रतिनिधी
मकारसंक्रांती (Makar sankranti) च्या सणांच्या दिवशी नाशिक जिल्ह्यावर दुःखाचे सावट पसरले आहे. नांदगाव तालुक्यातील (Nandgaon Taluka) तालुक्यातील सीमेवर तैनात असलेल्या जवानाला नेपाळ सीमेवर (Border of Nepal) वीरमरण आले आहे. कर्तव्यावर असताना विजेच्या तारीचा (Eletrick Shock) धक्का लागल्याने मृत्यू झाला. जवानाच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे.

अमोल हिम्मतराव पाटील (Amol Himmatrao Patil) (वय ३०) असं वीरमरण आलेल्या जवानांचे नाव आहे. जवान अमोल यांच्या निधनांची बातमी समजताच बोलठाणसह नांदगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे.

सशस्त्र सीमा बल (SRPF) नेपाळ येथील विरपूर सीमेवर कार्यरत असलेले अमोल हे सहकाऱ्यांसोबत सीमेवर तैनात होते. त्याचवेळी सुरू असलेल्या कामात विजेच्या धक्क्याने अमोल यांना वीरमरण आले. या अपघातात अन्य दोन जवानांना देखील वीरमरण आल्याची माहिती समोर आली आहे.

एकीकडे संक्रातीच्या सणाचा उत्साह असतांना आशा पद्धतीने जवानाला वीरमरण आल्याने संपूर्ण जिल्हा शोकमग्न आहे. अमोल यांच्यावर नांदगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.