नारायण राणेंना मारण्याची दिली होती सुपारी नितेश राणेंचा गंभीर आरोप

भाजपा आमदार नितेश राणे यांनी खळबळ जनक आरोप केला आहे. यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणात एकाच खळबळ उडाली असून विवध चर्चना उधान आले आहे. नितेश राणे यांनी त्यांच्या ट्विटर वरून हे आरोप केले आहेत . ट्विटमध्ये राणे म्हणाले आहेत. नारायण राणे यांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा त्यांना संपवण्यासाठी सुपारी दिली तथाकथित सभ्य आणि विचारी पक्ष प्रमुखाने .असा खळबळ जनक आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे .त्यामुळे आता राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.


राज्याचे राजकारण ढवळून निघालेले असताना राजकारणात रोजच नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. त्यात आता नितेश राणे यांनी आपल्या ट्विटर वरून खळबळ जनक आरोप केला आहे . राणेंचा उद्धव ठाकरे यांच्यावर रोष असल्याचे दिसत आहे . त्यामुळे आता ठाकरे विरुद्ध राणे असा वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे .नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये आरोप करत आता म्याव म्याव संपू द्या त्यानंतर आम्ही व्याजासकट वस्त्रहरण करू असा इशाराही दिला आहे.

कालच नाशिक जिल्ह्यातील नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये एकनाथ शिंदे गडचिरोलीचे पालकमंत्री असताना त्यांच्या सुरक्षेसंदर्भात उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केला होता या विधानावरून शिंदे गट आणि शिवसेनेत आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले असे असताना आता. भाजप आमदार नितेश राणे यांनी खळबळ जनक आरोप केला आहे.